Monday, July 10, 2023

अल्सर -जंतू संबंध

         अल्सर 


 अल्सर हा रोग  मानवास त्याच्या गुहेतील रहाणीमानाचा ठसा

आज ही देत आहे; अर्थात गुहेतील मानवाचे जठरातील

आम्ल वाढतअसे.(Hydrochloric Acid) ते ताच्या राहणी

  माना  च्या   गरजे नुसार 

शिकार झालेला (किंवा मारलेला) प्राणी

त्वरित खाणे ही त्या काळा ची गरज होती.कारण त्या काळात

फ्रिज किंवा मीठ नसल्याने प्राणी सडुन जाण्याची भीती

होती .तेव्हा जठरातील आम्ला ची मात्रा वाढणे व पोटात

आग पडल्यासारखे होणे व त्यामुळे मास खाणे हे नित्याचे

होते.

    आज जग बदलले आहे .मानवास शिकार करणे क्रमप्राप्त

ठरत नाही . तरीही शिकारी पेक्षा वेळे प्रसंगी  अधिक ताण

या धावपळीच्या जगात असतो . ऑफिसातील साहेबानी

रागविल्या वर जठतातील आम्ल वाढते व ते   गुहेतील

मानावाचे प्रमाणे वाढते.
     जठरातील ऍसिड वाढल्यावर जठरातील पेशींना दाह
पोहचतो.मग त्याचे रुपांतर व्रणात होते यालाच अल्सर
म्हणतात.
      काही माणसे  अशा ऍसिडिटी चे स्वतःच  डॉक्टर बनतात
जेवण जड झाले की सोडा पिणे आले या मुळे मीठ रासायनिक
प्रक्रियेतून होते.हे अपाय कारक आहे

      1982 साली एका ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी
Dr Barry Marshal आणी Dr Robin 
Waren अत्यंत महत्व पूर्ण शोध लावला की
अल्सर हा रोग जंतूंनी होऊ शकतो.(Helicobacter pylori)
हे जंतू अल्सर च्या मासात मिळाले. हे रोग जंतू एकाने तोंडानं
प्राशन केले व त्यास पोटातील ऍसिड वाढल्याचे कळलं.
2005 साली दोघांना नोबल पारितोषिक मिळाले.



आता या जंतूंच्या शोधा मुळे रोग निदान पद्धती त एक
नवीन पाऊल पडले.हेजंतु 90% रुग्णात असतात ह्या
रोगजंतूंचा मुकाबला करणे हे आलेच ,त्या मुळे अल्सर 
बरा  करणे म्हणजे नुसती ऍसिडिटी कमी करणे हेच

नाही तर अल्सर जर जंतूंमुळे असेल त्याचे निदान आणि
उपचार म्हणजे रोगजंतूंचा बिमोड करणे 
याचा अर्थ आज पर्यंत हा रोग मानसिक तणाव नि होतो
हे तितकेसे बरोबर नाही. कारण अल्सर च्या जंतूंचा
शिरकाव शरीरात झाल्यास ऍसिडिटी वाढेल किंवा
मानसिक ताणा मुळे ऍसिडिटी वाढल्या मूळे जंतूंना
उबदार घर मिळाल्या सारखे होईल .या बद्दल  आजतरी
 बरेच शास्त्रीय कयास केले जात आहेत .
National Institute of Health 
अमेरिकेतील जग प्रसिध्द संस्था आहे. ती संस्था आशा

निर्णयास आली की ,अल्सर हा जंतूंच्या लागणी मूळे
होतो ;आणि ह्या जंतूंचा मारा करणे हे अधिक चांगले
कारण केवळ अल्सर रोगाची लक्षणे कमी करणे ह्या मुळे
अल्सर चा प्रभाव तात्पुरता कमी हकती.पण परत थोड्याच
काळात रोगाची लक्षणे परत वरती डोकं काढतात.

     अल्सरच्या  जंतूंच्या नवीन उपचार पद्धतीने विमोड
केल्यास अल्सर परत होण्याचा धोका कमीत कमी
90% कमी होतो .अल्सर ऍसिड कमी करणाऱ्या 
औषधने तात्पुरता बरा होतो व बऱ्याच रुग्णांना वर्षा च्या
अखेरीस परत उदभवतो.हे माहीत असून ह्याचे कारण जगास
ज्ञात नव्हते .ते ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांन च्या संशोधना मुळे
कळले  व अल्सर निदान आणि उपचार पध्दती त
मोलाची भर पडली .

      ह्या संशोधनाचा अर्थ ऍसिड कमी करणाऱ्या औषधांना
आता अल्सर किंवा इतर काही रोगामध्ये थारा नाही, असा 
होत नाही .योग्य वैद्यकीय  सल्ला घेऊनच अल्सर च्या रुग्णाने
उपचार करून घेणे केव्हाही योग्यच .




















No comments:

Post a Comment